vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे)- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकणे म्हणजे जीवन जगण्याला मोठी ऊर्जा मिळते. शिवरायांचे आचार, विचार, पराक्रम, रयतेवरील राजाचं प्रेम, युद्ध तंत्र, या सर्व गोष्टी आपल्याला प्रचंड ऊर्जा आणि आनंद देणाऱ्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण सुरू करण्यात आले आहे.

 शाळेतील शिवचरित्र पारायणाचे हे चौथे वर्षे आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे ३ फेब्रुवारी पासून शिवचरित्र पारायणाला सुरूवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि संतांची कामगिरी, कथा विद्यार्थ्यांसमोर कथन करून या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे तर शिक्षक अंकुश ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म, प्रताप गडावरील पराक्रम, संध्या जगताप यांनी शिवरायांचे बालपण, चित्रा पाटील यांनी स्वराज्याची शपथ, तर माया सोनकांबळे यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ही कथा उत्कृष्टपणे सादर केले आहेत. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त, रसिका पाटील यांनी पन्हाळगडावरून विशालगडावर ही कथा मुलांना सांगितली.

    या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची असून ३ फेब्रुवारीपासून सुरू झालेले शिवचरित्र पारायण १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मुलं अत्यंत तन्मयतेने या कथा ऐकत आहेत.‌ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ढोल, ताशा, लेझीम च्या गजरात संपूर्ण गावातून राजांची मिरवणूक काढून शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

    विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी असे विशेष उपक्रम सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी घ्यावे, असे आवाहन यानिमित्ताने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे  शिवचरित्र पारायणावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा घेतली आहे. तसेच शनिवारी पावनखिंड हा चित्रपट दाखविला. या शिवचरित्र पारायणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.

000

संबंधित पोस्ट

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” (DEAF) बाबत बँकांकडून विशेष मोहिमेचे आयोजन,दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठ ठाणे जिल्ह्यातील 11 लाख 38 हजार 421 खातेदारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम; ग्रंथदान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

दर्जा, ट्रेसेबिलिटी आण मूल्यवर्धनावर भर दिल्यास निर्यात संधी अधिक वाढतील – सचिव एन. भवानीश्री शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा प्रभावी व्यासपीठ- जिल्हाधिकारी,हळद क्षेत्रातील शेतकरी-निर्यातदार संबंध मजबूत करण्यासाठी खरेदीदार-विक्रेता मेळावा