vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जालना शहरातील मस्तगड परिसरातील युवकांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

 

जालना, द प्रतिनिधी’

ऑगस्ट (प्रतिनिधी) – जालना शहरातील मस्तगड येथील युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये पियुष मुंगसे, यश मस्के, हरिओम डोळझाके, साई कासार, मंथन यादव, कुशल श्रीगादी, राहुल कुमावत, नैतिक आंबिलवादे, शुभम रहाड, आज्ञान भगत, तनिष्क मस्के, आशिष हेलगट, वंश गाजरे, अमेय जोशी, ईश्वर तिडके, कृष्णा कुलथे, वैष्णव तायडे, वैभव कोल्हे आदी नवयुवकांचा समावेश आहे.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी सर्व युवकांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी सांगितले की “भाजप परिवारात दाखल झालेल्या या नव्या ऊर्जेमुळे पक्ष आणखी सक्षम व सबळ होईल. युवाशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका महत्वाची असून भाजपच्या विचारधारेतून समाजहित साध्य करण्याची संधी नव्या पिढीला मिळणार आहे.” या प्रवेश सोहळ्याला तालुकाध्यक्ष श्री. संजय डोंगरे, श्री. शिवाजी दादा शेजुळ, तसेच भाजपा महानगर व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोवर्धन कोल्हेस्वीय सहायक

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान – मंत्री डॉ. अशोक वुईके अभियानात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता काम करा

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी– ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे