vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्य प्रतिनिधी-

छत्रपती संभाजीनगर,  – गणेश उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन पोलीस प्रशासन व गणेश मंडळ, नागरिकांत संपर्क, संयम आणि समन्वयाने उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश उत्सावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेची काळजी, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच विसर्जनासाठी करण्यात आलेल्या विशेष नियोजनाबाबत संबंधित विभागांना सूचना जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी दिल्या.

 गणेश मूर्तींच्या आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेशा संख्येने बंदोबस्त ठेवण्यात यावा. विसर्जन मिरवणूकी वेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक नियमन करण्याचे विसर्जनासाठी नद्या, तलाव तसेच कृत्रिम तलावांवर पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच उत्सावाचा काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार याची विशेष काळजी घेण्यात यावी. स्वच्छता मोहिम राबवून पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करावी. पर्यावरणपूरक मूर्ती व नैसर्गिक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात.

उत्सवाचा काळात जिल्ह्यातील संपूर्ण सार्वजनिक गणेश मंडळाची संपर्क यादी अद्यावत करुन पोलीस प्रशासनाने मंडळाच्या संपर्कात राहावे तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून विशेष तपासणी मोहिम राबविण्यात यावी, यात मिठाई, मोदक, नैवद्य, भेसळयुक्त पदार्थ तसेच दुकानावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

राज्यातील 🚨 पोलादपूरात मुसळधार पाऊस !  सह्याद्री डोंगररांगांमध्ये रात्रभर १०५ मिमी पावसाची नोंद, एकूण पावसाची नोंद १५७१ मिमीवर! 🌊 सावित्री नदी उत्तर वाहिनीने पात्र ओसंडले. 🏠 शहरातील मंदिर, घाट, मार्केट पाण्याखाली….

विधानपरिषद लक्षवेधी- :राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असूनही शाळा बंद नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांचे योग्य समायोजन होणार

योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’या धर्तीवर सुधारणा करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलशहीद जवानाच्या कुटुंबास एक कोटींची मदत ; गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव