vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्य प्रतिनिधी-

छत्रपती संभाजीनगर,  – गणेश उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन पोलीस प्रशासन व गणेश मंडळ, नागरिकांत संपर्क, संयम आणि समन्वयाने उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश उत्सावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेची काळजी, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच विसर्जनासाठी करण्यात आलेल्या विशेष नियोजनाबाबत संबंधित विभागांना सूचना जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी दिल्या.

 गणेश मूर्तींच्या आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेशा संख्येने बंदोबस्त ठेवण्यात यावा. विसर्जन मिरवणूकी वेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक नियमन करण्याचे विसर्जनासाठी नद्या, तलाव तसेच कृत्रिम तलावांवर पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच उत्सावाचा काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार याची विशेष काळजी घेण्यात यावी. स्वच्छता मोहिम राबवून पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करावी. पर्यावरणपूरक मूर्ती व नैसर्गिक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात.

उत्सवाचा काळात जिल्ह्यातील संपूर्ण सार्वजनिक गणेश मंडळाची संपर्क यादी अद्यावत करुन पोलीस प्रशासनाने मंडळाच्या संपर्कात राहावे तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून विशेष तपासणी मोहिम राबविण्यात यावी, यात मिठाई, मोदक, नैवद्य, भेसळयुक्त पदार्थ तसेच दुकानावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी-एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष लेख)-तंबाखूला नाही म्हणूया, आयुष्य सुंदर जगूया!”

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta