vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जागर स्त्रीशक्तीचा संवाद कार्यशाळासशक्त समाज निर्मितीत महिलांची भुमिका मोलाची- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जागर स्त्रीशक्तीचा संवाद कार्यशाळासशक्त समाज निर्मितीत महिलांची भुमिका मोलाची- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- समाजाची प्रगती होत असतांना हा समाज वैचारीक, सांपत्तिक आणि आरोग्यदृष्ट्या सशक्त असणे आवश्यक असते.कुटुंब सांभाळणारी महिला संस्कार करुन आपले कुटूंब आणि पर्यायाने समाज सशक्त बनवत असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

दशसूत्री कार्यक्रमांतर्गत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या उपक्रमांतर्गत महिला शिक्षकांसाठी विशेष संवाद कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, विचाराने धनवान होतो आणि आरोग्य व संस्कार हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. शिक्षणासोबत वैचारिक प्रगल्भता महत्वाची. नवदुर्गा व त्यांचे माहात्म्य हे आजच्या स्त्री मध्येही आहे. त्यामुळेच आपण सशक्त समाजनिर्मितीत करु शकता,असे त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षकांच्या आरोग्य तपासणीने झाली. या कार्यशाळेसाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनीषा वाशिंबे यांनी केले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी धनराज कांबळे यांनी केले.

०००००

संबंधित पोस्ट

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

आपत्ती निवारणासाठी आता नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन प्रतिसाद दल (DRF) राहणार सज्ज आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मदतकार्यासाठी विशेष दलाची रचना