vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

सातारा प्रतिनिधी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई साहेब हे नवरात्रोत्सवातील नऊ दिवस पायातील चपलांचा त्याग करून उपवास पाळतात. गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी हे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. यंदा नवरात्रोत्सवाच्या काळातच मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनतेचे, विशेषतः शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. जनजीवन विस्कळीत झाले. या परिस्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बाधित क्षेत्रांचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेला धीर दिला.दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणतीही तमा न बाळगता दुचाकीवरून चिखलातून अनवाणी फिरत शेतकऱ्यांचा बांध गाठला. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खंबीर आहे असा विश्वास दिला. त्याचबरोबर नुकसानीच्या भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही दिले.

या काळातही त्यांनी ना चप्पल घातल्या, ना उपवास सोडला. त्याग, कष्ट, कर्तृत्व आणि भक्ती यांचा वारसा जपत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना हा समाजकार्याचा वसा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडून मिळाला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या समाजसेवेचा वारसा मंत्री शंभूराज देसाई हे यशस्वीपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या संवेदनशिलतेबद्दल अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

0000

संबंधित पोस्ट

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी ११ व १३ एप्रिलला शिबिराचे आयोजन

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती ..

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्या-अंडी नष्ट, परिसरात हाय अलर्ट..

vishwatmaklokswamivarta