vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

जालना, प्रतिनिधी : नागरिकांसाठी पाणी पूरवठा हा महत्वाचा विषय असून, जिल्ह्याकरीता जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पूरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षेत आज जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीद्वारे आयोजित जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीती मैत्रेवार बोलत होत्या. यावेळी जिप ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाचे सहायक भूविज्ञानिक श्री. गिरीधरा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तालूका उप अभियंता आदींची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद आणि जालना या तालूक्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पूरवठा योजनेची कामे मंजूर झालेली आहे. तर उर्वरीत परतूर व मंठा तालूक्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेद्वारे 2 ग्रीड पाणी पूरवठा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरीता जलजीवन मिशन अंतर्गत 745 योजना मंजूर असून, याकरीता 524.31 कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे. या योजना पैकी 258 योजनाचे 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर 319 योजना या पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, उर्वरीत 164 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. जल जीवन मिशन योजनांच्या कामांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून 215 कोटी निधी प्राप्त झाला असून, हा सर्व निधी खर्च झाला आहे. तसेच झालेल्या कामाचे देयके अदा करण्यासाठी शासनाकडे 104 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती जिप ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.

****

संबंधित पोस्ट

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन-निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री

रस्त्यांवरील माती सफाई करून वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबईत सर्वत्र सखोल स्वच्छता…

vishwatmaklokswamivarta

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta