vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

जालना, प्रतिनिधी : नागरिकांसाठी पाणी पूरवठा हा महत्वाचा विषय असून, जिल्ह्याकरीता जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पूरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षेत आज जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीद्वारे आयोजित जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीती मैत्रेवार बोलत होत्या. यावेळी जिप ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाचे सहायक भूविज्ञानिक श्री. गिरीधरा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तालूका उप अभियंता आदींची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद आणि जालना या तालूक्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पूरवठा योजनेची कामे मंजूर झालेली आहे. तर उर्वरीत परतूर व मंठा तालूक्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेद्वारे 2 ग्रीड पाणी पूरवठा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरीता जलजीवन मिशन अंतर्गत 745 योजना मंजूर असून, याकरीता 524.31 कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे. या योजना पैकी 258 योजनाचे 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर 319 योजना या पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, उर्वरीत 164 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. जल जीवन मिशन योजनांच्या कामांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून 215 कोटी निधी प्राप्त झाला असून, हा सर्व निधी खर्च झाला आहे. तसेच झालेल्या कामाचे देयके अदा करण्यासाठी शासनाकडे 104 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती जिप ग्रामीण पाणी पूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.

****

संबंधित पोस्ट

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सामान्यांसाठी समर्पित’ ही भावना दाखवली,ध्वजारोहणानंतर ताफ्याला थांबवून जखमी दुचाकीस्वाराला मदत केली

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित-· बोरी सौर प्रकल्पामुळे ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;· प्रकल्प पुर्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे विशेष प्रयत्न..

vishwatmaklokswamivarta

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार