vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतंजली विद्यापीठाचा पदवीदान समारंभ..

नवी दिल्ली प्रतिनिधी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  हरिद्वार, उत्तराखंड येथे पतंजली विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला.या प्रसंगी भाषण करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, भारतातील महान व्यक्तिमत्वांनी मानव संस्कृतीच्या विकासात अमूल्य योगदान दिले आहे. महान ऋषी पतंजली यांनी योगासनांद्वारे मनातील, व्याकरणाद्वारे वाणीतील आणि आयुर्वेदाद्वारे शरीरातील अशुद्धी दूर केली. पतंजली विद्यापीठ समाजापर्यंत महर्षि पतंजलि यांच्या महान परंपरेचा प्रसार करीत असल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला

राष्ट्रपतींनी नमूद केले की, पतंजली विद्यापीठ योग, आयुर्वेद आणि नैसर्गिक चिकित्सा या क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि संशोधन पुढे नेत आहे. त्यांनी म्हटले की, हे प्रशंसनीय प्रयत्न असून या माध्यमातून निरोगी भारत घडविण्यासाठी उपयोग होत आहे.

राष्ट्रपतींनी पतंजली विद्यापीठाच्या भारतकेंद्रित शैक्षणिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, वैश्विक बंधुभावाच्या भावनेने प्रेरित शिक्षण, प्राचीन वैदिक ज्ञान आणि अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन यांचे एकत्रीकरण, तसेच जागतिक आव्हानांचे निराकरण, हे सर्व आधुनिक काळात भारतीय ज्ञानपरंपरेला पुढे नेत आहेत.

राष्ट्रपतींनी सांगितले की, या विद्यापीठाच्या आदर्शांनुसार शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे निश्चितच जाणवले असेल की, पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली अवलंबणे हे मानवजातीच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हे विद्यार्थी हवामान बदलासह सर्व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास नेहमी तत्पर राहतील

राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या सदाचरणाने एक निरोगी समाज आणि विकसित भारत घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतील.

संबंधित पोस्ट

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचाजन्मदिवस वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा 

vishwatmaklokswamivarta

पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात- अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा,वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल- कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण