vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत

 

 सांगली, प्रतिनिधी: खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, उडीद व मूग खरेदीकरता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी एनईएमएल )NemL पोर्टलवर 31 डिसेंबरअखेर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील व संचालक मंडळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया राबविण्यात येते. केंद्र शासनाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता प्रति क्विंटल सोयाबीन – 5328/- रूपये, मूग – 8768/- रूपये व उडीद 7800/- रूपये असे किमान आधारभूत दर निश्चित केले आहेत.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेडमार्फत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया दिनांक 15 नोव्हेंबर 2025 पासुन सुरु करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात हंगाम 2025-26 मधील सोयाबीन खरेदी करिता विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ, सांगली केंद्र (सांगली) व ॲड आर आर पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, तासगाव केंद्र (तासगाव) ही खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.

शासनाने FAQ प्रतीच्या सोयाबीन साठी रु. 5328/- प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीकरिता शेतकऱ्यांचा चालू (2025-26) हंगाम मधील ऑनलाईन सोयाबीन पीकपेऱ्याची नोंद असलेला ७/१२ उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करुन घावी. नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहाणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांची FAQ मालाची खरेदी करण्यात येईल. खरेदी करिता SMS प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दिपक बोऱ्हाडे यांची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतली भेट

vishwatmaklokswamivarta

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

विदर्भातील पूरस्थितीचा आढावा-मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश- मंत्री गिरीश महाजन

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

vishwatmaklokswamivarta