vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय

राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने  घेतला

मुंबई प्रतिनिधी15 ऑगस्टपासून राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये राज्यभरातील मॉल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांना लसीच्या दोन डोसची अट ठेवण्यात आली आहे. या एका अटींमुळे राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने  घेतला आहे

मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले अन् 14 दिवस पूर्ण झालेले असावेत, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. पण मॉलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक ठिकाणाचे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार माजी सैनिकाचा मैदानावरच मृत्यू; मुंबई येथील घटना

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज विधिमंडळातील सहकाऱ्यांसोबत पाहिला- राहुल नार्वेकर- सभापती

किडनी तस्करी प्रकरणी पुणे येथील रुबी हॉल क्लिनीकच्या डॉक्टरांसह 50 जणांवर गुन्हा दाखल

होळी व धुलिवंदननिमित्त हार्दिक शुभेच्छा!

vishwatmaklokswamivarta