
राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने घेतला
मुंबई प्रतिनिधी15 ऑगस्टपासून राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये राज्यभरातील मॉल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांना लसीच्या दोन डोसची अट ठेवण्यात आली आहे. या एका अटींमुळे राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने घेतला आहे
मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले अन् 14 दिवस पूर्ण झालेले असावेत, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. पण मॉलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक ठिकाणाचे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



