vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

असंघटीत कामगारांच्या विकासासाठी योजना राबवाव्यात  – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

असंघटीत कामगारांच्या विकासासाठी योजना राबवाव्यात  – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

      अमरावती, प्रतिनिधी- कामगार विभागातर्फे असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कार्य करण्यात येत आहे. येत्या काळात कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी विकासाच्या योजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

   जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटीत कामगार, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, बाल कामगार कृतीदल समिती व बालकामगार सल्‍लागार समन्‍वय समिती, वेठिबगार दक्षता समिती, माथाडी व असंघटीत कामगार यांच्याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सहायक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे, सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत झंवर, कुलदिन भोलाने आदी उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, असंघटीत क्षेत्रात काम करणारा वर्ग हा कमी उत्पन्न असलेला घटक आहे. त्यामुळे त्याला सामाजिक सुरक्षा जास्त प्रमाणात देण्यात यावी. त्यांच्या विकासासाठी असणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने घरासंदर्भात योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमध्ये प्रामुख्याने निवृत्तीनंतर किंवा काम सोडल्यानंतर लाभ द्यावयाचे आहेत. मात्र कामगारांचे कौशल्य विकसित करण्यावरही भर देण्यात यावा. कामगारांची आयुष्मान भारत योजनेत नोंदणी करावी, त्यामुळे त्यांना पाच लाख रूपयांचा प्रत्येक वर्षी आरोग्याचा लाभ मिळू शकेल.   बाल व किशोरवयीन कामगार हे प्रामुख्याने विटभट्टीवर आढळून येतात. आतापर्यंत यात 28 जणांबाबत कारवाई करण्यात आली आहे. मेळघाटातील कामगार हे प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात स्थलांतरीत होतात. त्यामुळे अमरावती आणि अकोला जिल्ह्यांनी संयुक्तपणे कारवाई करावी. कारवाईपश्चात गुन्हा दाखल झाल्यानंतरही या प्रकरणाचा कामगार विभागाने पाठपुरावा करावी. जिल्ह्यात छोटे टेक्सटाईल उद्योगामध्येही बालकामगार असण्याची शक्यता आहे. याठिकाणीही पडताळणी करण्यात यावी, असेही निर्देश श्री. येरेकर यांनी दिले.

 

000000

संबंधित पोस्ट

जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप

कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्सव – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शेती, संस्कृती आणि ग्रामीण पर्यटनाचा दि. १५ ते १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य सोहळा

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta