vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

जालना प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ५० टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ दुधाळ गाय/म्हशीचे वाटप. ७५ टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ भृनाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभण कालवड वाटप. २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा. २५ टक्के अनुदानावर फट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा. ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप. २५ टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा. १०० टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे/ठोंबे वाटप. तरी या योजनांचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जालना यांनी केले आहे. तसेच योजनांसंबंधी अधिक माहितीकरीता विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव जालना यांना ८६०५४५१८५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर,मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साह‍ित्यिकांची निवड तर डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी पूर्ण करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश जून २०२६ पर्यंत क्रेडिट डेटा अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार तात्काळ उपचार….