मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश,मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतमागील पाच दिवसापासून आझाद मैदानात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेले मनोज रंगे पाटील आणि यांच्या लाखो समर्थकांना आज यश मिळालेले आहे राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत आणि त्यांनी आज उपोषण सोडले आहे आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस म्हणून इतिहासात नोंद घेतला जाईल असे अनेक समर्थकांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्याचे दिसून आलेले आहे
आज राज्य सरकारने,मराठा समाजाच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत –
१ मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि रोजगार देण्याची प्रक्रिया तात्काळ केली जाईल.
२ आंदोलकांवर दाखल केलेले फौजदारी गुन्हे सप्टेंबर २०२५ अखेर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी.
३ सर्व ग्रामपंचायतींचे ५८ लाख रेकॉर्ड/नोंदणी नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्याचे निर्देश.
४ जात प्रमाणपत्र तपासणी प्रक्रिया.
अर्ज सादर केल्यापासून ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश.
५ न्यायाधीश संदीप शिंदे (निवृत्त) समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवला, समिती रेकॉर्ड शोधत राहील.सरकारने संबंधित विभागांना ही सर्व कार्यवाही पूर्ण करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.