vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी.

 महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी..

 राज्य प्रतिनिधी-उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्र, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दक्षिणेकडून आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेससह हलका पाऊस पडू शकतो. केरळच्या किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि तिथून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे हे हवामान बदल घडत आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सध्या पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. २७ जानेवारीच्या सुमारास ही बर्फवृष्टी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा चार ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. काश्मीरमधील सरोवरदेखील गोठले असून, पहाटेच्या वेळी रस्ते आणि बागांवर बर्फाचे जाड थर साचलेले दिसत आहेत. हिमालयातून येणाऱ्या या थंड वाऱ्यांमुळे केवळ उत्तरच नव्हे, तर मध्य भारतातही पुढील अठ्ठेचाळीस तासांत थंडीची तीव्रता अधिक वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३० जानेवारीच्या रात्रीपासून आणखी एक पश्चिमी विक्षोप सक्रिय होणार आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. या थंडीचा प्रभाव मध्य प्रदेशपर्यंत आणि अंशतः महाराष्ट्रातील खान्देश व नाशिक पट्ट्यात जाणवेल. या काळात उत्तर भारतात दाट धुके पडण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.

महाराष्ट्रात एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचे सावट यामुळे शेतीकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल*

ओसवाल पार्क परिसरातील जाहिरात फलक दुर्घटनेची महापालिकेकडून गंभीर दखल..परवानगी रद्द,

नागरिकांच्या सक्रिय सहभागातून रायगड जिल्हा विकासाचे नियोजन* — महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे*स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

नीट-पीजी 2025 परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर मंडळाच्यावतीने सदनिका संगणकीय सोडत..

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…