vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत…

        अमरावती, प्रतिनिधी : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सन 2025-26 या वर्षासाठी ‘पारधी पॅकेज’ अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या फक्त पारधी आणि फासे पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

     पारधी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पाच मुख्य योजनांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट घेण्यासाठी अर्थसहाय्य. स्वयंरोजगारासाठी ऑटो रिक्षा खरेदीकरिता मदत, संगणक व झेरॉक्स मशीन खरेदी करून तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य, पारधी समाजातील बचतगटांसाठी ट्रॅक्टर खरेदीची सुविधा, गरजू लाभार्थ्यांना व्यवसायासाठी ई-खटला खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे.

    लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विविध तालुकानिहाय अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यासाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती कार्यालय, मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यासाठी उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असतील.

      प्राप्त अर्जांची संगणकीय यादी तयार करून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांची निवड ‘ईश्वर चिठ्ठी’ पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.     याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील विकास शाखा किंवा दुरध्वनी क्रमांक 07226-224217 यावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ सोहळ्याचे मुंबईत उद्घाटन- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा..

vishwatmaklokswamivarta

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta