vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा,भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेली झारखंड ही एक वैभवशाली भूमी आहे ,असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, या पवित्र भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि प्रतिष्ठेच्या प्रेरणादायी कथांनी भरलेला आहे.या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी राज्यातील सर्व कुटुंबांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जनजाति गौरव दिनाच्या पवित्र प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र मातृभूमीच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण करते असे ते म्हणाले. परकीय राजवटीतील अन्यायाविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेल्या गौरवशाली झारखंडच्या सर्व रहिवाशांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. भगवान बिरसा मुंडांच्या या भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाच्या कथांनी भरलेला आहे.या खास प्रसंगी, मी, माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांसह, राज्याच्या प्रगती आणि समृद्धीची कामना करतो.”

संबंधित पोस्ट

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

सीएसएल’ कोची द्वारा निर्मित पहिले ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट –‘माहे’ नौदलाकडे सोपवण्यात आले

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीयअवघ्या २१ दिवसांत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण ; आयुक्तांनी मानले नागरिकांचे आभार..

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…