vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा,भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेली झारखंड ही एक वैभवशाली भूमी आहे ,असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, या पवित्र भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि प्रतिष्ठेच्या प्रेरणादायी कथांनी भरलेला आहे.या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी राज्यातील सर्व कुटुंबांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जनजाति गौरव दिनाच्या पवित्र प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र मातृभूमीच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण करते असे ते म्हणाले. परकीय राजवटीतील अन्यायाविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेल्या गौरवशाली झारखंडच्या सर्व रहिवाशांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. भगवान बिरसा मुंडांच्या या भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाच्या कथांनी भरलेला आहे.या खास प्रसंगी, मी, माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांसह, राज्याच्या प्रगती आणि समृद्धीची कामना करतो.”

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धाअधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखताआणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

vishwatmaklokswamivarta

मुंबईत दुकानांवर मराठी फलक न लावल्यास सोमवारपासून होणार कारवाई; मुंबई महानगर पालिकेचा चा इशारा…

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक जाहीरपनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

पीएफआयच्या ब्लॅकलिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहसह राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा समावेश; PFI च्या कार्यकर्त्याकडून धक्कादायक पत्र

vishwatmaklokswamivarta