vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा,भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेली झारखंड ही एक वैभवशाली भूमी आहे ,असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, या पवित्र भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि प्रतिष्ठेच्या प्रेरणादायी कथांनी भरलेला आहे.या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी राज्यातील सर्व कुटुंबांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जनजाति गौरव दिनाच्या पवित्र प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र मातृभूमीच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण करते असे ते म्हणाले. परकीय राजवटीतील अन्यायाविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेल्या गौरवशाली झारखंडच्या सर्व रहिवाशांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. भगवान बिरसा मुंडांच्या या भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाच्या कथांनी भरलेला आहे.या खास प्रसंगी, मी, माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांसह, राज्याच्या प्रगती आणि समृद्धीची कामना करतो.”

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 9 हजार 650 प्रकरणे निकाली60 कोटी 42 लाख 83 हजार 637 रुपयाची तडजोड रक्कम वसूल..

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रीक वाहन रॅलीतून केली जनजागृतीअर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपारिकऊर्जा वापरास चालना द्यावी- अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या 380 विक्रमी फेऱ्या चालवणार

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार*   *- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta