विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…
विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…
– विविध योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधीक लाभ वितरण- 40 स्टॉलच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती..
सांगली, प्रतिनिधी : प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येक नागरिकास समान संधी मिळून न्याय लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा सांगलीच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज व्यक्त केला,
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा कणा आहे. सर्व वकील बांधव हे या न्याय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि निष्ठेने न्यायव्यवस्थेला बळकटी दिलेली आहे. न्याय, निष्ठा आणि संविधान यांच्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो. त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करूया, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत व देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत विधी महाविद्यालय विटाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विटा च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शेवटी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.