vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून  समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे- विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न…

– विविध योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधीक लाभ वितरण- 40 स्टॉलच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती..

सांगली, प्रतिनिधी : प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येक नागरिकास समान संधी मिळून न्याय लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा सांगलीच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज व्यक्त केला,

  जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा कणा आहे. सर्व वकील बांधव हे या न्याय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि निष्ठेने न्यायव्यवस्थेला बळकटी दिलेली आहे. न्याय, निष्ठा आणि संविधान यांच्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो. त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करूया, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत व देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत विधी महाविद्यालय विटाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विटा च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शेवटी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

नवी दिल्लीत १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’ राज्याचा विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना