vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी:- दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र युडीआइडी कार्ड, ई-दिव्‍यांग प्रमाणपत्र (E-Disability Certificate) व आधार कार्ड संबंधित योजनांशी संलग्न करणे आवश्यक करण्यात आले आहे.

राज्य शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआइडी कार्ड व आधार कार्ड संबंधित कार्यालयात तात्काळ जमा करावे.

शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी DBT पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ अखंडपणे सुरू राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे.

तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्ड संबंधित तहसील कार्यालय येथे 31 मार्चपूर्वी तात्काळ जमा करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta