vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

  मुंबई, प्रतिनिधी- बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमल बजावणी ही काळाची गरज आहे. त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ प्रशिक्षणार्थी न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून उदयास यावेत आणि कामगार विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान पोहोचवावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.

  परळ येथील ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मंत्री ॲड. फुंडकर बोलत होते.

    प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडाव्यात. नवीन कामगार संहितांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

      संस्थेच्या संचालक रोशनी कदम – पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करुन अधिकारी वर्गाची भूमिका विषद केली. राज्यातील विविध विभागांतून आलेले कामगार विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात आले.

संबंधित पोस्ट

प्रतिबंधात्मक आदेश

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता, सुसुत्रता आणणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ५.८ टक्के दराने परतफेड

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…