vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन                                               

स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्हा तसेच तालुका स्तरावर राबविण्यात येत असून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून अर्जाची सद्यस्थिती तपासावी. अर्ज सेंड बॅक झाल्यास संबंधित त्रुटीची पूर्तता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून 16 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करावी. अपलोड केलेली कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयात आणण्याची आवश्यकता नाही.

ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज पात्र असूनही त्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वाधार योजनेसाठी वर्ग करण्यासाठी सेंड बॅक करण्यात येत आहेत. यासाठी 12 मार्च 2026 ही अंतिम संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त झाल्यानंतर तात्काळ स्वाधार योजनेसाठी अर्ज करावातसेच ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज ‘अप्रुव्ह’ झाला आहे त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती योग्यरीत्या भरावी. संबंधित बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अर्ज ‘अंडरस्कुटने मध्ये असल्यास त्याची तपासणी प्रक्रिया सुरू असल्याचे समजावे.

विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकृत इंस्टाग्राम व फेसबुक पेज samajkalyannanded ला फॉलो करून अद्ययावत माहिती मिळवावी. कोणत्याही अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींशी संपर्क साधू नये. अडचणी असल्यास थेट समाज कल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची जलपातळी घटली, वैतरणा धरणा मध्ये केवळ 10% पाणी…

vishwatmaklokswamivarta

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील)व राष्ट्रीय कृषी विकास योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम-प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

दिव्यांग-मतदारांसाठी जनजागृत्तीपर कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

vishwatmaklokswamivarta