
देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन
राज्य प्रतिनिधी -भारतात आज अवयव दानाचे प्रमाण फक्त 0:28℅ऐवढे कमी आहे. कारण याबाबत समाजात खूप अज्ञान आहे. देहदान अवयव दानाच्या संदर्भातील भ्रम, भिती व अंधश्रद्धा दूर करून देहदान, अवयव दानाचे वास्तव समाजाच्या लक्षात आणून द्यायचे असतील तर हा विषय सर्व विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे अभ्यास मंडळावर काम करणाऱ्या मंडळींनी याचा विचार केला पाहिजे असे आवाहन देहदान समिती मेडिकल कॉलेज, नागपूरचे सं माननीय सदस्य प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांनी केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई येथे मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ” देहदान, अवयव दान:- भ्रम आणि वास्तव ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देहदान अवयव दान हा मनुष्य जगविणारा विषय आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी ला अभ्यास, व संशोधनासाठी मानवी मृतदेहच मिळाले नाहीत तर त्यांच्या पदवी चा दर्जा कसा असेल?भविष्यात त्याच्या हातून घडणारी रुग्ण सेवा कोणत्या दर्जा ची असेल
याचा विचार होणे गरजेचे आहे.



