vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

 राज्य प्रतिनिधी -भारतात आज अवयव दानाचे प्रमाण फक्त 0:28℅ऐवढे कमी आहे. कारण याबाबत समाजात खूप अज्ञान आहे. देहदान अवयव दानाच्या संदर्भातील भ्रम, भिती व अंधश्रद्धा दूर करून देहदान, अवयव दानाचे वास्तव समाजाच्या लक्षात आणून द्यायचे असतील तर हा विषय सर्व विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे अभ्यास मंडळावर काम करणाऱ्या मंडळींनी याचा विचार केला पाहिजे असे आवाहन देहदान समिती मेडिकल कॉलेज, नागपूरचे सं माननीय सदस्य प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांनी केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई येथे मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ” देहदान, अवयव दान:- भ्रम आणि वास्तव ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

      पुढे बोलताना ते म्हणाले की, देहदान अवयव दान हा मनुष्य जगविणारा विषय आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी ला अभ्यास, व संशोधनासाठी मानवी मृतदेहच मिळाले नाहीत तर त्यांच्या पदवी चा दर्जा कसा असेल?भविष्यात त्याच्या हातून घडणारी रुग्ण सेवा कोणत्या दर्जा ची असेल

याचा विचार होणे गरजेचे आहे.

        आपल्या देशात वेळेवर अवयव मिळाला नाही म्हणून दरवषी लाखो लोक अकाली मरतात. तरी कोणी याकडे लक्ष देत नाही म्हणून अवयव दानाचा टक्का वाढत नाही. त्यामुळे आता शिकल्या सवरल्या लोकांनी देहदान अवयव दान जनजागृतीची पताका आपल्या खांद्यावर घेण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन डॉ सुशील मेश्राम यांनी केले.यावेळी मानसशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. निलेश ठाकरे यांनी सुद्धा देहदान अवयव दानाचे मानवी जीवनातील

 महत्व प्रतिपादन केले. ते म्हणाले की, हा आपल्या देशातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जनजागृती करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या विद्यापीठात वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासक्रमात देहदान अवयव दान या विषयाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. या चळवळीला समाजातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करु. देशाप्रती असलेले आपले उत्तर दायित्व पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न रत राहू असे प्रतिपादन डॉ निलेश ठाकरे यांनी केले.

  कार्यक्रमाला एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचया अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष च्या संचालिका डॉ. प्रज्ञा वाकपैंजण तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रेखा चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन डॉ.सुभाष चव्हाण यांनी केले.

संबंधित पोस्ट

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यातून समाजविकासाला बळ : जय हनुमान मित्र मंडळाचा उपक्रम उत्साहात

vishwatmaklokswamivarta

इंदोर महानगरपालिकेच्या अभ्यासगटाने नवी मुंबई शहराला भेट देत आधुनिकता व नाविन्यपूर्णतेची केली प्रशंसा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘डिजिटल जनगणने’ ची तयारी सुरू६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta