vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

लातूर, प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार, लातूर जिल्ह्यात ‘विशेष सघन पुनरावलोकन’ (SIR) कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या मोहिमेतंर्गत मतदार यादीतील अस्पष्ट (ब्लअर) फोटो, डी.एस.ई., एस.आय.आर. मॅपिंग आणि नावातील दुरुस्ती ही कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत केली जात आहेत. ३१ मार्च २०२६ ही मुदत संपल्यानंतरही हे काम सध्या सुरू असून, मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे मॅपिंगचे केवळ ५७ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, त्यांना बीएलओमार्फत सुनावणीसाठी बोलावले जाईल. अशा सुनावणीस दोन ते तीन वेळा अनुपस्थित राहिल्यास किंवा आवश्यक पुरावे सादर न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून थेट वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३४-लातूर ग्रामीण आणि २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या भागातील बीएलओंची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी.

या प्रक्रियेसाठी मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे आई, वडील, आजी किंवा आजोबा यांचा तपशील https://voters.eci.gov.in/searchInSIR/SZUA4DPDF-JKSQWODSE या अधिकृत लिंकवर किंवा ‘ECINET’ या ॲपवर शोधून बीएलओ यांना उपलब्ध करून द्यावा. विवाहित महिलांनीदेखील त्यांच्या माहेरच्या (२००२ मधील) नातेवाईकांची माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे. ही मोहीम मतदार यादी अधिक शुद्ध आणि त्रुटीरहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत कायम राखण्यासाठी तत्परतेने माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री प्रताप सरनाईक दर्जेदार रुग्णसेवेसाठी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

सैलानी यात्रा महोत्सवाचे नियोजन करावे-   पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा८ ते २३ मार्च दरम्यान यात्रा महोत्सव ४-५ लाख भाविक येण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta