vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली, प्रतिनिधी.) : जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीस पुतळा समिती सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक भैराप्पा तळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. पी. मिरजकर, जत नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदि उपस्थित होते.

अध्यक्ष, महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनेनुसार पडताळणी केली गेली. त्यामध्ये मुख्याधिकारी नगरपरिषद जत यांचा ठराव व अहवाल, पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अहवालान्वये सर्व संबंधित यंत्रणांनी मौजे जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याबाबत अहवाल सादर केला होता.

या अनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे पालन पुतळा उभारणाऱ्या संस्थेने / कार्यालयाने करण्याचे तसेच पुतळ्याची रचना, आकारमान इत्यादीबाबत बारकाईने निरीक्षण करण्यात येऊन लवकरात लवकर सदरचा अश्वारूढ पुतळा बसविण्याबाबतची कार्यवाही अध्यक्ष, महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी करणे या अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास मंजुरी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री गिरीश महाजन,नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत..

vishwatmaklokswamivarta

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी..