vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरा जपणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देत राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक दि. १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.

या महोत्सवात युवकांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन)या उपक्रमांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती तसेच युवा मंडळांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ५ वाजेपर्यंत आपली online नोंदणी dscraigad.2009@rediffmail.com या ई-मेलद्वारे करावी.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, प्रकाश वाघ यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी भूखंड व अनाधिकृत बांधकामबाबत लक्षवेधी सूचना प्रकरणात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली प्रत्यक्ष स्थळपाहणी…

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta