
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…
जालना प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात होणाऱ्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. या आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येवून मदत करत आहेत. तरी अंबड तालुक्यातील झिरपी येथील सरपंच संदीप पवार यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत शासनाकडून सरपंचाना जे मानधन मिळते, त्यातील एक वर्षाच्या कालावधीतील रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांचे आभार मानले.
-*-*-*-*-



