ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧
बुलढाणा, प्रतिनिधी-ग्रामीण भागातील जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायतींकडे सुयोग्य हस्तांतरण करण्यासाठी 8 ते 22 मार्च दरम्यान प्रत्येक पात्र गावात ‘जल अर्पण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात या उपक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात येणार आहे.
🔹 उपक्रमाचा उद्देश:✔️ पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे✔️ ग्रामपंचायतींची जबाबदारी व मालकी मजबूत करणे✔️ सुरक्षित व शाश्वत पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती🔹 पूर्वतयारीमध्ये समाविष्ट:✅ 15–30 दिवसांची नळ पाणीपुरवठा योजना चाचणी✅ योजनेची तांत्रिक पडताळणी✅ दस्तऐवजीकरण पूर्ण करणे✅ फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी गुणवत्तेची तपासणी✅ ऑपरेटर व ‘नल जल मित्र’ प्रशिक्षण✅ स्त्रोत शाश्वतता व सुरक्षितता आराखडा🔹 जल अर्पण दिवसाचे प्रमुख उपक्रम:🎒 शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी👩👩👧 महिला सहभाग🤝 जल प्रतिज्ञा व जल पूजन📊 Meri Panchayat App & Panchayat Dashboard प्रदर्शन🏆 विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमया उपक्रमाचे नियोजन प्रकल्प संचालक सतीश देशमुख व कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे
.💡 ग्रामपंचायतींसाठी आवाहन:ग्रामपंचायतींनी आवश्यक अभिलेखे प्राप्त करून योजनेची इत्यंभूत माहिती सुनिश्चित करावी व पाणी कर आकारणी व वसुली प्रभावीपणे करावी.💧 “पाणी ही केवळ सुविधा नसून भविष्यासाठीची सामायिक जबाबदारी आहे.”