vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल …

जालना,  (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात गहू लागवडीमध्ये श्रीराम फार्म सॉल्युशन्सने विकसित केलेल्या ‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ आणि ‘श्रीराम सुपर १-एसआर-१४’ या गहू बियाण्यांनी उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे. या सुधारित जाती उच्च उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता आणि विविध हवामान परिस्थितींमध्ये जुळवून घेण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध झाल्या आहेत. भारतातील कृषीला बळकटी देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

श्रीराम फार्म सॉल्युशन्सच्या जागतिक दर्जाच्या गहू वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या या जाती श्रीराम सुपर १-एसआर-१४ आणि ५-एसआर-०५ त्यांच्या उत्कृष्ट उत्पादकता आणि अनुकूलन क्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत. या जातींमध्ये अधिक कल्ले, लांब बाळ्या आणि रोगांविरुद्ध सहनशीलता आहे. विशेष म्हणजे, बदलत्या हवामान आणि नव्या आव्हानांमध्येही या जाती उत्तम परिणाम देतात. त्यामुळे भारतातील विविध भागांतील शेतकऱ्यांची ही दोन्ही जाती पहिली पसंती बनल्या आहेत.

अनुभवी शेतकरी विपुल वसंतराव देशमुख सांगतात की यावर्षी त्यांनी आपल्या शेतात श्रीराम सुपर ५-एसआर-०५ गहू पेरला. त्यांचे म्हणणे आहे की या जातीचा खोड मजबूत असल्याने पिके पडण्याची शक्यता राहत नाही. त्याचबरोबर कल्ल्यांची संख्या जास्त असून प्रत्येक ओंबीत ८५ ते ९० दाणे मिळाल्याने उत्पादन अत्यंत चांगले आले. ते म्हणतात, “विपरीत हवामानातही या बियाण्यांमुळे स्थिर आणि उत्कृष्ट उत्पादन दिले हा खरोखरच विश्वासार्ह गहू प्रकार आहे.”

त्याचप्रमाणे श्रीराम सुपर १-एसआर-१४ या जातीबद्दलही शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. शेतकरी मंगेश कुमार सांगतात की गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात हे बियाणे पेरले होते. त्यांच्या माहितीनुसार, या जातीच्या ओंब्या अधिक लांब आहेत, कल्ले जास्त येतात आणि प्रति बाळी दाण्यांची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय या जातीला पाणीही तुलनेने कमी लागते. मंगेश कुमार इतर शेतकऱ्यांनाही ही जात पेरण्याचा सल्ला देतात.

——————————————

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’छायाचित्रे पाठविण्यासाठी 02 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान..

vishwatmaklokswamivarta

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

कोलपल्ली नाल्याच्या पुरात अडकलेले ग्रामसेवक उमेश धोडरे यांना जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने वाचवले*

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा #शपथविधी गुरुवार, १४ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे.