vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

भारतीय टपाल विभागाची “फ्रँचायझी 2.0” योजना सुरू;रोजगारासह टपाल सेवा विस्ताराची मोठी संधी

लातूर, प्रतिनिधी: भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी “फ्रँचायझी 2.0” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, दुकानदार आणि इच्छुक व्यक्तींना विभागाचे अधिकृत फ्रँचायझी भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार असून, टपाल सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

फ्रँचायझी धारकांना स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल बुकिंग आणि टपाल वितरण यांसारख्या सेवा पुरविता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व कार्यक्षम सेवा देण्यासोबतच, या योजनेमुळे स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये टपाल सेवेचा विस्तार करणे आणि विभागाच्या देखरेखीखाली एक विश्वसनीय यंत्रणा उभी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

ज्या इच्छुक नागरिकांकडे आवश्यक जागा, मूलभूत सोयी-सुविधा आणि निर्धारित पात्रता आहे, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. “फ्रँचायझी 2.0” योजना ही टपाल सेवांचा विस्तार, डिजिटल सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यांचा एक प्रभावी संगम आहे. या योजनेमुळे टपाल सेवा अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक होणार असून, जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे डाकघर अधीक्षक आर. एस. बोटलावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयाशी किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

****

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठीवस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य..

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

शिक्षिकेची मरणोत्तर सामाजिक बांधिलकी- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाखांची देणगी

अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीस संलग्न गावे व शेतीला अपाय होणार नाही याची दक्षता घ्या-उद्योग मंत्री उदय सामंत..

vishwatmaklokswamivarta