vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

जालना, (प्रतिनिधी)- बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येथील रायझिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्याजालना जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सुदाम काळै, गणेश काळे, माजी उपसरपंच सुरेश

आरसुड, दगडू आरसुड, प्रमोद आरसुड, शाळेच्या संचालिका रेखा आरसुड,मुख्याध्यापिका अनिता जोरले, प्राजक्ता सोनटक्के, आकांक्षा चौधरी, नेहागायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरतांना जिल्हाप्रमुख रुपम घुगे म्हणाल्या की, ग्रामीण भागातीलविद्यार्थीही प्रचंड मेहनत करुन शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर विराजमानझालेले आहे. या शाळेला भेट देण्याचा आनंददायी योग आला. शाळेतील दोनविद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा सन्मान मिळाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट ठरली. या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना घुगे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमधील जिद्द,मेहनत आणि उज्ज्वल भविष्याची झलक पाहून मन भरून आले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळेच आपल्यासमाजाचा आणि देशाचा भविष्यकाळ अधिक उज्ज्वल होणार आहे, असेही रुपम घुगे

म्हणाल्या. यावेळी गावकर्‍यांसह विद्यार्थी व पालक, शिक्षकांची उपस्थिती होती.

[फोटो अ‍ोळी……-बाजार वाहेगाव येथील रायझिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांची नवोदयविद्यालयासाठी निवड झाली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनाजिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.]

संबंधित पोस्ट

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते-अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

अभ्यासिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा -बालविवाहाची माहिती मिळाल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगली आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद,३३.६० लाखाची उलाढाल..