vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज;*नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

*अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज;*नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई*

 

*रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:* जिल्ह्यामध्ये बालविवाहाची अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी १९ एप्रिल २०२६ रोजी असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या काळात ग्रामीण आणि आदिवासी भागांत बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

      नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शशिक्षणाधिकारी आणि बाल कल्याण समितीसह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

 यावेळी उपायुक्त (बाल विकास) यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, अक्षय्य तृतीया किंवा आखातीजच्या काळात जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

    बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार, मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. या वयापेक्षा कमी वयात विवाह लावून देणे हा गंभीर गुन्हा आहे. जर अशा स्वरूपाचा विवाह लावला गेला, तर केवळ वर-वधूचे आई-वडीलच नव्हे, तर विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, मंडप व्यावसायिक, वाजंत्री आणि अगदी लग्नाला उपस्थित राहणारे वऱ्हाडी सुद्धा शिक्षेस पात्र ठरू शकतात. या गुन्ह्यासाठी १ लाख रुपये दंड आणि २ वर्षे सक्तमजुरीची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

     ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गावागावात होणाऱ्या लग्नांच्या वयाची शहानिशा करण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.

   रायगड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि यंत्रणांनी प्रशासनाला सहकार्य करावे, गावात किंवा परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील आणि कोणतीही अघटित घटना घडणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन 

भारतीय रेल्वे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या 380 विक्रमी फेऱ्या चालवणार

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी

निवडणूक प्रचारावरील निर्बंधात बदल-मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० पासून प्रचारबंदी लागू

vishwatmaklokswamivarta

सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामस्थळी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करणेविषयी नोटीस..

vishwatmaklokswamivarta