रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका संगमेश्वर या ठिकाणच्या मासरंग गावी परेल – मासरंग व बोरिवली – मासरंग एसटी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी मुंबईकर स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. गेली अनेक वर्षे सुरू असणारी मासरंग – परेल ही एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. परळ आगार व्यवस्थापन कार्यालयात पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक मुंबईकर रहिवासी (गावकरी )अनंत सोनू कदम, सुहास कदम, उत्तम कदम आदींनी याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.