vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळठळक बातम्याप्रदेश

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून..

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे ही स्पर्धा होईल.

 पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटात सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून प्रवेशिका व नियमावली मंडळाच्या www.public.mlwb.in यासंकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभाग व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

  महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विविध कंपन्या, कारखाने आदी आस्थापनांच्या पुरुष संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे, तर महिला संघांसाठी ही स्पर्धा खुली असेल. तिनही गटातील अंतिम विजेत्या संघाना प्रत्येकी ५० हजार रुपये, अंतिम उपविजेत्या संघांना प्रत्येकी ३५ हजार रुपये, अंतिम उपांत्य उपविजेता संघाना प्रत्येकी २० हजार रुपये बक्षिसे दिली जातील. तसेच विजेत्या संघांना सांघिक चषक, खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. मुंबई व ठाणे वगळता बाहेरगावाहून येणाऱ्या संघांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रतिदिन ४ हजार रुपये दिले जातील. महिलांच्या मुंबई व ठाणे येथील संघांना प्रतिदिन १ हजार रुपये प्रवास खर्चासाठी दिले जातील. पुरुष संघासाठी ३००रुपये आणि महिला संघासाठी २०० रुपये प्रवेश शुल्क असेल.

प्रवेशिका प्रवेश शुल्कासह हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई येथे स्विकारल्या जातील. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व भारतीय कबड्डी संघटनेच्या नियमानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल डॉ. संजय लाखेपाटील यांची मािहती

vishwatmaklokswamivarta

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिका यांचे जाहीर आवाहन

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta

शिवकालीन शिवशस्त्र व वाघनखे बघण्याची नागपुरकरांना संधी

vishwatmaklokswamivarta

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta