vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्षेत्रात दि. 28 एप्रिल 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकांसाठी दि. 28 एप्रिल रोजी मतदान, तर दि. 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.अलिबाग तालुक्यातील बैजाळी, नागाव, खंडाळे, मुरुड एकदरा, काशिद, मांडला, कर्जत पाली तर्फे कोतल खलाटी, खालापूर होराळे,, माणगाव वणी मलईकोंड, रोहा पुई, महाड मोहोप्रे, ताम्हाणे, वराठी, पोलादपूर महालगुर,तुर्भे बुद्रुक, म्हसळा घोणसे, आणि श्रीवर्धन दिवेआगर, बागमांडला आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण 18 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

पोलीस हवालदार समद खान पठाण सेवानिवृत्त-समाजसेवक मुसा खान यांनी सेवानिवृत्त बद्दल पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta