vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

नांदेड प्रतिनिधी: राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.०० हे आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण आणि तांत्रिक सुसूत्रता राखण्यासाठीजुन्या प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढणे अनिवार्य आहे.

सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील भरपूर प्रमाणात अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व महाविद्यालयांनी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. सदरील पात्र अर्ज तात्काळ या कार्यालयाचे स्तरावर पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्तता होत नसतील व जे अर्ज अपात्र आहेत असे अर्ज आपल्या स्तरावरून रिजेक्ट करण्यात यावेत.

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील प्रलंबित अर्ज मंगळवार ५ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निकाली काढावेत तसेच सन २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्ज रविवार १० मे २०२६ पर्यंत निकाली काढावेत. सदरील मुदत ही अंतिम असून यानंतर सदरील अर्जावर कार्यवाही होणार नाही, याची नोंद घायवी. तारखेनंतर एकही अर्ज प्रलंबित राहिल्यास व एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

मॅजिकल महाराष्ट्र’ दालन ठरले प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू डिजिटल दालनाची प्रेक्षकांवर मोहिनी..

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

वाशी येथे जुने सुस्थितीतील कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 813.3 किलो कपड्यांना मिळाले नवजीवन..

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta