vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा

जालना प्रतिनिधी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना गावपातळीवरील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश दिले. विहित कालमर्यादेमध्ये सर्व प्रकारचे फेर फारची निर्गती होईल याची दक्षता घ्यावी. कार्यालयाच्या दर्शनी भागात उपस्थिती व भेटीचे वेळापत्रक स्पष्टपणे नमूद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुका किंवा जिल्हास्तरीय बैठकीसाठी बाहेर जाणार असल्यास संबंधित गावकऱ्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महसूल संबंधित प्रकरणांमध्ये विलंब होऊ नये यासाठी फेरफारसारखी सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यालयीन कामकाजात कोणत्याही खाजगी व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.यासोबतच, शासकीय वापरातील युजर आयडी आणि डिजिटल स्वाक्षरी कोणत्याही परिस्थितीत खाजगी व्यक्तींना देऊ नयेत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना दिल्या.नागरिकांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि जनहिताभिमुख करण्यासाठी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये *-अन्न व औषध प्रशासन विभाग*

vishwatmaklokswamivarta

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

महाज्योती’ची ऑनलाईन प्रशिक्षण योजना लोकप्रियतेच्या शिखरावर  – मंत्री अतुल सावेजेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नव्याने अर्ज करण्यासाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ..

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार