vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

    सांगली, प्रतिनिधी : कडेपूर मधील मौजे ढाणेवाडी खडीआई मंदिरच्या खालच्या बाजूला असलेल्या फॉ. कं. नं. 123 मधील राखीव वनक्षेत्रात गस्त करीत असताना दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी साधारण 2 च्या सुमारास चार संशयित इसम यांना खैर वृक्षांची तोड करून वाहतुकीच्या तयारीत असताना पकडले आहे. या प्रकरणी 28 हजार 27 रूपये किंमतीचा खैर लाकूड माल जप्त करण्यात आला आहे, असे वनविभागामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

     याबाबत प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, या प्रकरणी खैर नग 35, घ.मी. 0.642 खैर जळाऊ लाकूड माल 11.000 घ.मी असा 28 हजार 27 रूपये किंमतीचा खैर लाकूड माल जप्त केला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिंदेवाडी पो. मायणी येथील योगेश विलास भिसे (वय वर्षे 31) व रूपेश विलास भिसे (वय वर्षे 36) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी येथील रामचंद्र दादासो मोहिते (वय वर्षे 40) व रमेश पांडुरंग मोहिते (वय वर्षे 23) या आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (d), 26(1) (f) अन्वये नियतक्षेत्र कडेपूर प्रथम गुन्हा रिपोर्ट दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये रामदास वेताळ, गुरूदत्त पवार, विशाल यादव, सिध्दार्थ होवाळ हे वनकर्मचारी सहभागी होते.

या प्रकरणाचा पुढील तपास सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक (वने) नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कडेगांव – पलूस संतोष शिरशेटवार, परिमंडळ वन अधिकारी कडेपूर सुजित गवते, वनरक्षक कडेपूर माधवराव मुसळे, वनरक्षक वांगी रोहन मेसे, विशेष वनरक्षक सोनसळ गणेश करांडे, वनरक्षक सोनसळ अक्षय शिंदे करीत आहेत.

वृक्षतोडीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्याबाबत तात्काळ वनविभागास 1926 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जेईई JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन