vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्तया महापूजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष महापूजा याच पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्तया महापूजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष महापूजा याच पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न

📍 मुंबई प्रतिनिधी-गुजरातमधील #सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रभास पाटण येथे विशेष महापूजा पार पडली. या पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष हा विशेष कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

सोमनाथ मंदिर भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्य अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही ते आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे. महमूद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र मंदिराचे अस्तित्व आणि त्यामागील श्रद्धा कधीही नष्ट होऊ शकली नाही. भारत केवळ भौगोलिक देश नसून तर तो एक चिरंतन संस्कृती आहे. विविध मंदिरे, साधू-संत आणि #सनातन परंपरेमुळे भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. ‘सनातन’ म्हणजे ज्याचा अंत नाही आणि सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक भन्साळे यांनीही महादेवाचे दर्शन घेतले. यानंतर मान्यवरांनी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रदर्शनालाही भेट दिली

00000

संबंधित पोस्ट

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

लखपती दिदी’च्या माध्यमातून मिळेल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या शालांत परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका 23 माध्यमिक शाळांचा निकाल 94.72 टक्के**अंशिका यादव 95 टक्के गुण संपादन करीत नमुंमपा शाळांमध्ये सर्वप्रथम*

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान- ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमातील भावनिक क्षण

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta