vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

 अमरावती, प्रतिनिधी : : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19मे 2026 रोजी ‘पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिंद्र ॲन्ड महिंद्र, पुणे कंपनीमध्ये शासन मान्यताप्राप्त ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप’ करण्याची संधी जिल्ह्यातील उमेदवारांना मिळणार आहे.

 या मेळाव्याच्या माध्यमातून कंपनीतील हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी 10 वी, 12वी आणि आय.टी.आय. उत्तीर्ण असलेले तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना एकूण 18 हजार 55 रुपये विद्यावेतन दिले जाईल. यामध्ये 9 हजार 55 रुपयांसह प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या भत्त्याचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांना कंपनीकडून जेवण आणि बस सुविधा पूर्णपणे मोफत पुरवली जाणार आहे.

 इच्छुक व गरजू उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या अधिकृत लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 19 मे रोजी शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथील कार्यालयात स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा व पत्त्याचा पुरावा घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0721-2566066 किंवा 8983419799या क्रमांकावर संपर्क साधावा.******

संबंधित पोस्ट

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

अमृत महा आवास अभियान २०२२-२३ मधील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल21 डिसेंबरला होणार मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta