vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

        सांगली, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या वतीने “समाधान समारोह 2026” अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत दि. 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केली आहे. या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेव्दारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. यामध्ये वकील, पक्षकार आणि संबंधित हितधारकांनी सक्रिय सहभाग घेऊन वादांचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

       न्यायप्रकियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने “समाधान समारोह” या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात दि. 21 एप्रिल 2026 पासून झाली असून, दि. 21 ते 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीमध्ये त्याचा समारोप होणार आहे.

      यामध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने (ऑनलाईन) उपस्थित राहू शकतात. यामध्ये सहभागासाठी पक्षकार आणि त्यांचे वकील https://forms.gle/jqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकव्दारे अर्ज करू शकतात. तसेच https://www.sci.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026 असून अधिक माहितीकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी

वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल-१) भव्य परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

आंतराष्ट्रीय योग दिन,आबालवृद्धांचा योग सरावात उत्स्फूर्त सहभाग बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामूहिक योगासन.

एमआयडीसीतील विकास कामांचा डिपीआर तयार करावा – पालकमंत्री पंकजा मुंडे  

vishwatmaklokswamivarta