vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

 सांगली, प्रतिनिधी) : राज्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के पर्यंत वाढविण्याकरिता संपूर्ण राज्यात सन 2026 ते सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात सन 2026 मध्ये कृषी दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जुलैपासून 15 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेऊन संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे. वृक्षारोपणासाठी लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.

300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सामाजिक वनीकरण सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सहआयुक्त नगरविकास दत्तात्रय लांघी, सहायक वनसंरक्षक मयुर शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, कृषी दिनाचे औचित्य साधून 15 लाख वृक्षारोपण करण्याच्या दृष्टीने पोटखराब जमीन निश्चित करावी. रोपांचे संवर्धन योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासाठी जमीन निवडताना पाण्याचा स्त्रोत जवळ असेल अशा पध्दतीने निवड करावी. महापालिका, नगरपालिका /नगरपरिषद /नगरपंचायत, ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपणासाठी जमिनीची निवड संबंधित विभागांनी काळजीपूर्वक करावी. प्रत्येक विभागाने येत्या 10 जून पर्यंत जागा सुनिश्चित करावी. वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्धतेचे नियोजन करून संबंधित ठिकाणी रोपे दोन ते तीन दिवस अगोदर पोहचतील यादृष्टीने संबधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे यांनी 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली.

0000

 

000000

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे 18 नोव्हेंबर 2025 पासूनमीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक सुरु…

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवंत मंदिर येथे महापूजा व घरकूल लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वितरण