vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

 सांगली, प्रतिनिधी) : राज्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के पर्यंत वाढविण्याकरिता संपूर्ण राज्यात सन 2026 ते सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात सन 2026 मध्ये कृषी दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जुलैपासून 15 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेऊन संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे. वृक्षारोपणासाठी लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.

300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सामाजिक वनीकरण सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सहआयुक्त नगरविकास दत्तात्रय लांघी, सहायक वनसंरक्षक मयुर शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, कृषी दिनाचे औचित्य साधून 15 लाख वृक्षारोपण करण्याच्या दृष्टीने पोटखराब जमीन निश्चित करावी. रोपांचे संवर्धन योग्यरित्या होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासाठी जमीन निवडताना पाण्याचा स्त्रोत जवळ असेल अशा पध्दतीने निवड करावी. महापालिका, नगरपालिका /नगरपरिषद /नगरपंचायत, ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपणासाठी जमिनीची निवड संबंधित विभागांनी काळजीपूर्वक करावी. प्रत्येक विभागाने येत्या 10 जून पर्यंत जागा सुनिश्चित करावी. वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्धतेचे नियोजन करून संबंधित ठिकाणी रोपे दोन ते तीन दिवस अगोदर पोहचतील यादृष्टीने संबधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे यांनी 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी वृक्षारोपणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली.

0000

 

000000

संबंधित पोस्ट

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यकारिणीचा-भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सत्कार

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती