vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी एसटी पार्सल सेवा देणाऱ्या कंत्राटदारांनी माथाडी कायद्याला अनुसरून कामगारांना त्यांचे सर्व कायदेशीर लाभ मिळवून दिले पाहिजेत. तसेच कायद्याप्रमाणे माथाडी कामगारांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जावे, असे स्पष्ट निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले.

नरिमन भवन येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत बैठक पार पडली. बैठकीस कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव स्वप्निल कापडणीस आदी उपस्थित होते. तसेच आमदार सदाभाऊ खोत यांनी दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, मे. ज्युबिलन्ट फूड वर्क प्रा. लिमिटेड या औद्योगिक आस्थापनाने स्थानिक भूमिपूत्र बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली पाहिजे आणि तेथील माथाडी टोळीला तत्काळ मान्यता द्यावी. नवीन माथाडी कामगारांची नोंदणी करण्यासह पडताळणी करावी. या नवीन नोंदणीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांनाच पहिले प्राधान्य देण्यात यावे.

माथाडी कामगार आणि कंपन्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आपल्या स्तरावर औद्योगिक आस्थापना आणि माथाडी कामगार यांची संयुक्त बैठक आयोजित करावी. या बैठकीत माथाडी कामगारांच्या प्रश्नांचे निरसन करावे, असेही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन