vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

 

     जालना, प्रतिनिधी जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, वि.जा-भ.ज. इ.मा.व. वि.मा.प्र. एस.ई.बी.सी या प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदर प्रवर्गातील 11 वी व 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहित. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. सदर बाब विचारात घेवून जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

 जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी विहित वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी त्वरित अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा व त्याची एक प्रत दि. 31 मार्च, 2025 पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना या कार्यालयात सादर करावी. ज्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत व ज्यांना समितीने ऑनलाईन त्रुटी कळविल्या आहेत, अशा अर्जदारांनी अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा. अर्जदार/पालकांनी उपरोक्त विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने याबाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन समितीमार्फत करण्यात येत आहे.

****

संबंधित पोस्ट

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ !पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शेणे येथे मेळावा संपन्न*

vishwatmaklokswamivarta

*पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा राज्यात तिसरा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील* खरिप हंगामासाठी शंभर टक्के पीक कर्ज वितरण करा

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta