vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

 

               बुलडाणा, प्रतिनिधी: शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धती, जलसंधारण आणि उत्पादनवाढ यासाठी कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल शेती शाळा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन शेतीत नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम व पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

   या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान बदलाचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचा शाश्वत वापर याबाबत प्रशिक्षण देणे हा आहे. डिजिटल माध्यमातून उपलब्ध असलेल्या या प्रशिक्षणामुळे शेतकरी घरबसल्या ज्ञान घेऊ शकतील व आपल्या शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील. “डिजिटल शेती शाळा” उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.digitalkhetishala.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

> डिजिटल शेती शाळाचे वेळापत्रक : झुमद्वारे मोफत प्रशिक्षण -वेळ व झुम आयडी/पासकोड खालीलप्रमाणे:

* बाजरी – 26 मे, सायं. 6:15 ते 7:15 ID: 89845701136 | Pass: 624786,

* खरीप ज्वारी – 27 मे, सायं. 6:15 ते 7:15 ID: 89024794378 | Pass: 237266

* भात – 28 मे, सकाळी 10 ते 12 ID: 83942449675 | Pass: 445624

* घेवडा (राजमा) – 29 मे, सायं. 6:15 ते 7:15 ID: 87366079713 | Pass: 626140

* भाजीपाला – 24 मे, सायं. 7:30 ते 9:30 ID: 83989924758 | Pass: 689151

000000

संबंधित पोस्ट

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढग फुटी भीषण पूरस्थिती अनेक अनेक मृत्युमुखी तर अनेकांचा शोध सुरू घटनास्थळी प्रशासन तत्परतेने काम चालूच

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta