vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*

जालना प्रतिनिधी- जालना शहरातील आणि ग्रामीण भागात विजेच्या समस्येमुळे नागरिकांना आ. अर्जुन खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत प्रशासनाला या गंभीर घटनेकडे तातडीने लक्ष घालून अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी पावले उचलून विद्युत डीपीआर तयार करावा लागत आहेत , आ. अर्जुन खोतकर यांच्या भूमिकेला शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेने भरभरून पाठिंबा दिला आहे .

       गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे या त्रासाला कंटाळून विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी याबद्दल अनेक तक्रारी व आंदोलने केली होती परंतु विद्युत विभागाने याकडे कानाडोळा केल्यामुळे शहरातील दवाखाने छोटे-मोठे उद्योग आणि भर उन्हाळ्यात वयोवृद्ध आणि लहान बालकांना उन्हाचां भयंकर त्रास सोसावा लागला होता या सर्व बाबी गांभीर्याने घेऊन आ. अर्जुन खोतकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शहरातील विजेच्या प्रश्नावर शासनावर भडीमार करत हा प्रश्न आक्रमकपणे मांडल्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन विद्युत विभागाचे मुख्य अभियंता आणि अन्य अधिकाऱ्यांना हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आदेशित केल्यामुळे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जालना येथे बैठकीत विद्युत विभागाचे सर्व जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी आणि अभियंते यांनी आठ दिवसाच्या आत या समस्यांचे कायमचे निराकरण करण्यासाठी डीपीआर तयार करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सांगितल्यामुळे यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे , श्री. खोतकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत विजेचा गंभीर प्रश्न सोडविल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्ये त्यांचे विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे जुना जालना भागात गेल्या अनेक महिन्यापासून अखंडित विद्युत पुरवठा आणि विजेचा लपंडाव पाहावयास मिळत होता , श्री. खोतकर यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे या भागातील नागरिक सुखावल्याचे पहावयास मिळते , आ‌. अर्जुन खोतकर यांनी या समस्यावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद , अहमद नूर , साईनाथ चीन्नदोरे , जिल्हा कार्याध्यक्ष मिर्झा अन्वर बेग , अजीम बागवान , वैभव नालेगावकर , जॉर्ज उगले , संतोष निकाळजे , शेख मुजमील , जावेद अली , बाबा पठाण , इमरान खान , शेख. अहमद , सिताराम तुपे , सिराज बागवान , माणिक चव्हाण आदींनी त्यांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत करुन अभिनंदन केले .

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..

सरला बेट विकास आराखडा व देवगाव शनि येथील बंधाऱ्यासमंजूरी देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध

जिजा ने साले की शादी 21 किलो फुलो का हार तोहफे शादी समारोह मे दुल्हा दुल्हन को पहनाया- उत्तर प्रदेश के जिला प्रतापगढ़ गाँव बंसी पुरवाइसअनोखे उपहार की पुरे जीले में चर्चा..

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीतून विजय शिंदेंचा सोललेल्या लसूण विक्रीचा व्यवसाय..

vishwatmaklokswamivarta