vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

मुंबई, प्रतिनिधी : यश विद्यानिकेतन या वसई येथील शैक्षणिक संस्थेने शासनाची परवानगी न घेता शाळेचे स्थलांतर केल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकरणी संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. तसेच शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत क्षेत्रभेट न देता शाळांची नोंदणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत यश विद्यानिकेतन ग्लोबल शाळेतील आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासंदर्भात सदस्य राजन नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी सदस्य प्रशांत बंब आणि प्रवीण दटके यांनी उपप्रश्न विचारले.

मंत्री भुसे म्हणाले की, वसईतील विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश देऊन त्यांना न्याय देण्यात येईल. संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी विद्यानिकेतन ग्लोबल शाळा किंवा परिसरातील शाळेची क्षेत्रीय भेट न घेता शाळेची नोंद केल्याचे निदर्शनात आले आहे. गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वसई, संबंधित विस्तार अधिकारी (शिक्षण) व संबंधित केंद्रप्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले

सदरची शाळा शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित करण्यात आली असून याप्रकरणी संबंधित संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वसईतील संबंधित शाळेत आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना त्यांनी ऑनलाइन निवडलेल्या दहा शाळांपैकी रिक्त जागांवर प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही मंत्री दादाजी भुसे यांनी दिदिली.0

0000

 

संबंधित पोस्ट

कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उल-फित्रच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या. 

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !*

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती

vishwatmaklokswamivarta