vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘कौशल्य विकास काळाची गरज’  वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘कौशल्य विकास काळाची गरज’

वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना, प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिन (15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना आणि विंध्याचल शिक्षण संस्थेच्या व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्य विकास काळाची गरज’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौशल्य विकासाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करून चालत नसून त्यासोबत विविध कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कौशल्याच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, रोजगाराच्या संधी वाढतात तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेचे नवे मार्ग खुलतात, असे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी दत्ता जाधव यांनी समावेशक, शांततापूर्ण आणि शाश्वत सामाजिक विकासासाठी आजच्या तरुणांनी आधुनिक काळाच्या गरजेनुसार विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कौशल्यसंपन्न युवकच भविष्यात देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. डी. जेडगे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षणाबरोबरच उद्योगजगताच्या गरजेनुसार कौशल्ये विकसित केल्यास रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील, असे मत व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम मोहिते यांनी केले, तर उपप्राचार्य प्रा. गुलशन राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना तसेच विंध्याचल शिक्षण संस्थेच्या व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर येथील अधिकारी, कर्मचारी व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ.राजेश गवांदे आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यानच्या नवीन स्थानकासाठीचा निधी रेल्वे बोर्डाने तातडीने वर्ग करावा रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करा, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करा,कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करा, मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करा गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त गाड्या सोडा.. खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा  

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन