आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.
राज्य प्रतिनिधी –
आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.
राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर, आणि गोलाघाटसह १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
सुमारे ८०० गावं पाण्याखाली असून, तीन लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत.
अप्पर आसामच्या काही भागांत रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली.
ईशान्य सीमा रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मधेच थांबवल्या, तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.