vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

अहिल्यानगर, प्रतिनिधी: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat), अहिल्यानगर आणि सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा शक्ती-नशामुक्त भारताची शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन दि. २९ जुलै २०२६ रोजी सीएसआरडी, अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करणे, या उद्देशाने जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक स्वरूपात सहभागी होता येणार आहे

स्पर्धांमध्ये लोकगीत (गायन), नृत्य, नुक्कड नाटक, माईम, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच कविता (स्लॅम पोएट्रीसह) या विविध कला व साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, सर्व स्पर्धांचा विषय ‘नशामुक्त भारत’ हा आहे. युवकांनी आपल्या कलाकृतीतून व्यसनमुक्तीचा प्रभावी व सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहेस्पर्धेतील विजेत्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

इच्छुक स्पर्धकांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी करून इच्छित स्पर्धेची निवड करावी आणि मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी ९४२३४७०४३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळव

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

vishwatmaklokswamivarta

धारावीतील खराब रस्ते व अडथळा युक्त फुटपाथ सुधारावेत धारावी नागरिक समितीची मागणी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा· शाळा प्रवेशोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत